Sunday, October 10, 2010

अशुभनशिनि नवरात्र उत्सव



आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अशुभनशिनि नवरात्र उत्सव सुरू झाला आहे.

अशुभनशिनि नवरात्र उत्सवाचे महत्व :- (मातृवात्स्यल्यविंदानम ग्रंथ)
श्रीराम अवतारात आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी श्रीराम-लक्ष्मण-हनुमंत ह्यानी मिळून अशुभनाशिनी स्तवनाचे १०८ वेळा पठण करताच ती श्री रामवरदायिनि श्री रामांना विजय प्राप्ती चा आशीर्वाद देते. पंचमीच्या दिवशी काकरूपी असुर दुर्गमाचावध करते. आश्विन शुद्ध अष्टमी च्या सूर्यास्ता आधीच्या क्षणी रामांनी रावणाचा वध केला.
आश्विन शुद्ध नवमी च्या दिवशी  श्रीराम-जानकी-लक्ष्मण ह्यानी मिळून  महिषासूर मर्दिनीचे "श्रीवज्रमंडलपीठपूजन" केले. श्री रामवरदायिनि च्या अवतारामुळे व श्रीरामांनी केलेल्या पूजानामुळे आश्विन महिन्यात "अशुभनशिनि नवरात्र पूजन" चालू झाले.

परमपुज्य सदगुरू बापू यांनी प्रवचनात सांगितले आहे की या दिवसात जास्तीत जास्त पवित्र स्पंदन संपूर्ण विश्वात प्रॅसवली जातात. या वर्षीचा नवरात्र उत्सव हा अत्यंत महत्वाचा आहे कारण या सर्व दिवसात माता महिषासूर मर्दिनीची सर्व रूपे एकाच वेळी भक्त रक्षणासाठी म्हणजेच अशुभनाशनासाठी पूर्णपणे कार्यरत आहेत.तसेच परमपूज्य सदगुरू बापूनी गुरूक्षेत्रम् च्या दर्शनाचे महत्व वारंवार प्रवचनातून सांगितले आहेच. त्यामुळे या उत्सवात जास्तीत जास्त वेळा हया आदिमातेचे दर्शन घेणे ही सर्व भक्तांसाठी पर्वणीच आहे. ती माता महिषासूर मर्दिनीची फक्त मूर्ती नसून ती स्वतः आदिमाता हया गुरूक्षेत्रम् मध्ये प्रगटली आहे. या उत्सवात भक्त, चंडिका मातेला आपले प्रेम विविध स्वरुपात अर्पण करू शकतात.
- मातृवात्स्यल्यविंदानम ग्रंथाचे नवरात्री संहिता पठण
- राम चरित्राचे वचन, पठण. उदा. रामरसायन, सुंदरकांड
- श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् आणि श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् यांचे पठण
- आदिमातेची पॅंचोपचारे ऑटी भरणे
- पुष्प अर्पण करणे

No comments:

Post a Comment